मुंबई मॅरेथॉनसाठी मणिपूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या एल. अरुणादेवीने भारतीय महिलांमध्ये पहिला नंबर तांत्रिक दृष्ट्या पटकावला तरी तिला याचं सेलिब्रेशन करता आलं नाही. आपल्या जिद्द आणि चिकाटीने यश संपादन करणाऱ्या या मणिपुरी कन्येचे श्रेय तिच्या समोरचं हेरावलं गेलं.
फिनिश लाईनवर आल्यावर तिला भारतीय न समजता दुर्लक्ष करण्यात आले. स्पर्धेत भारतीय महिलांमध्ये अव्वल स्थानी असणाऱ्या अरुणादेवीला फिनिशिंग लाईनवर पोहचल्यावर अस्वस्थ वाटायला लागले. त्यावेळी तिला कोणी पाणी नव्हतं तसेच तिचा मसाज करण्यासाठीही कोणीही फिरकलं नाही. शेवटच्या क्षणी वेगाने धावल्याने तिला चालणंही शक्य नव्हतं, अशा अवस्थेत एका मुलीने तिला रुमवर नेलं. आपण अव्वलस्थानी आल्याचे तिने वेळोवेळी सांगितले पण कोणी लक्षच दिलं नाही. तशा अवस्थेत ती रुमवर पडून राहिली.
भारतीय महिला गटात प्रथम आल्याचे माहित असल्यामुळे ती निश्चिंत होती. परंतु, सत्कार समारंभासाठी तिला कोणीच बोलावले नाही, त्यावेळी तिचा पाया खालची जमीन सरकली. एवढं यश संपादन करून काहीच मान मिळाला नाही. त्याबद्दल तिला आश्चर्य आणि मला वाईट वाटले. थकवा दूर झाल्यावर बक्षिसाच्या आशेने अरुणादेवीने आयोजकांपैकी अनेकांना सांगण्याचा प्रयत्न केला. तिचीही करुण हाक कोणाच्याही कानावर पडली नाही.
सकाळपासून फक्त दोन चॉकलेट खाऊ स्पर्धेत उतरल्याने तिला चक्कर येत होती. त्यातून सावरली, पण तो पर्यंत वेळ गेला होता आणि सत्कार समारंभ आटोपला होता. अखेर आयोजकांना आपलाच शेखचिल्लीपणा समजला आणि त्यांनी अरुणादेवीचा शोध घेतला आणि तिला पत्रकारांसमोर आणून आपली चूक लपवण्याचा प्रयत्न केला.
एवढे होवूनही आयोजकांनी तिला सटिर्फिकेट देण्याचं सौजन्यही दाखवलं नाही. स्पर्धेत गोल्ड मेडलची कामगिरी करणाऱ्या
अरुणादेवीला खाली हातच मणिपूरला जावे लागणार आहे.